दिवाळी २००९

मराठी भाषेतील नकारात्मक वाक्यरचनेतील क्रियापदे

मराठीमध्ये नकारात्मक वाक्यांत क्रियापदांची रूपे सकारात्मक वाक्यांपेक्षा वेगळी दिसतात. नकारात्मक वाक्यांतील क्रियापदांच्या रूपाबद्दल येथे मी वर्णनात्मक विवेचन करणार आहे.

स्तिमित करणारा बौद्धिक आवाका

डॉ० अशोक केळकर यांनी १९६४ ते २००५ या चाळीसहून अधिक वर्षांत साहित्य, संगीत, नाटक, नृत्य, शिल्प, वास्तुकला इ० कलांची मीमांसा करताना लिहिलेल्या लेखांचा संग्रह 'रुजुवात' च्या रूपाने मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे. या संग्रहातील काही महत्त्वाचे लेख आतापर्यंत मराठीत प्रकाशित झालेले नव्हते. जे प्रसिद्ध झाले होते ते नियतकालिकांत किंवा ग्रंथांत विखुरलेले होते. डॉ० केळकरांचे हे लेख एकत्र करून छापल्यामुळे त्यांच्या विचार-व्यूहाची अधिक नेमकी ओळख करून घेणे जिज्ञासू वाचकाला आता शक्य झाले आहे.(परीक्षित पुस्तक : रुजुवात - अशोक रा० केळकर. लोकवाङ्मय गृह, मुंबई. २००८. पृष्ठे २४+३१६. किंमत रु० ६००/-)

सामाजिक भाषाविज्ञानातील संख्यात्मक संशोधन-पद्धती

samajik-bhashajivan-akruti1लेखाची रूपरेषा

१. सामाजिक भाषाविज्ञान (सा०भा०वि०) या ज्ञानशाखेची व्याप्ती; सा०भा०वि० या संज्ञेचा स्थूल अर्थाने व मर्यादित अर्थाने वापर
२. संशोधनाची उद्दिष्टे, 'संशोधन प्रश्न', गृहीतके निश्चित करणे
३. समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांच्या अभ्यासासाठी लागणारी सामग्री कशी गोळा करावी?
४. गोळा केलेल्या सामग्रीचे विश्लेषण कसे करावे?
५. भाषेतील परिवर्तनीय घटक आणि सामाजिक भेद यांच्या परस्परसंबंधातून कसे निष्कर्ष काढता येतात - संख्याशास्त्राची मदत

परीक्षणासाठी आलेली पुस्तके

* 'आरपार लयीत प्राणांतिक' (दीर्घकविता) - प्रज्ञा दया पवार. लोकवाङ्मयगृह, मुंबई. २००९. पृष्ठे ५५, मूल्य रु० ६०.००
* कविता : भाषा व परिसर - डॉ० शिवाजी पाटील. रजत प्रकाशन, औरंगाबाद. २००८. पृष्ठे १०३. किंमत रु० १००.००
* आम्ही भावंडं - संपा0 आशा गुर्जर. गायत्री साहित्य, पुणे. २००९. पृष्ठे १९४. किंमत रु० १५०.००
* भाषा : विचार, वर्तन आणि अध्यापन - डॉ० विद्यागौरी टिळक. सुविद्या प्रकाशन, पुणे. २००९. पृष्ठे १११. किंमत रु० १००.००

धुळे जिल्ह्यातील दलित समाजाची बोली : अहिराणीचा सामाजिक भेद

प्रत्येक समाजाची स्वत:ची अशी वेगळी बोली असते. त्या बोलीचा वर्णनात्मक पद्धतीने जसा अभ्यास करता येतो, तसा सामाजिक अंगानेही करता येतो. धुळे ग्रामीण परिसरातील दलित-महार जातीची बोली अहिराणी असली तरी तिच्यातील सामाजिक - सांस्कृतिक - धार्मिक घटकांच्या वेगळेपणामुळे त्या जातीच्या अहिराणी बोलीत लक्षणीय वेगळेपण निर्माण झालेले आढळते.

मराठीतील आघातांचे उच्चार व लेखन

आपल्या मराठीसाठी वापरण्यात येत असलेली लिपी ही नागरी किंवा देवनागरी ह्या नावाने ओळखली जाते. हिंदी, मराठी आणि नेपाळी ह्या तीन भारतीय भाषांनी पूर्वी संस्कृतच्या लेखनासाठी वापरली जाणारी लिपी जशीच्या तशी उचलली. मराठी भाषेसाठी ती आपण अंदाजे एक हजार वर्षांपासून वापरीत आहोत. तिचा स्वीकार करताना ती आपल्या भाषेच्या उच्चारांसाठी पुरी पडते की नाही हे पाहिले गेले नाही.

आरपार लयीत प्राणांतिक

काव्यविषय झालेल्या विठाबाईंशी पुस्तकाच्या सुरुवातीला साधलेल्या मनोगतसदृश संवादातून कवयित्रीची लेखनामागची भूमिका लक्षात येते. संस्कृतीचा पोट-संस्कृतीशी अन्वय लावणे, तसेच जातिव्यवस्थेतल्या उतरंडीत सर्वात पायतळी ढकलल्या गेलेल्या बाईची जिद्द आणि कलेची ताकद जाणवून देणे, ही दलित-स्त्रीवादी भूमिका त्यामागे आहे.

(भाषा) शिक्षणाचा खेळ(खंडोबा) - संपादकीय

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या सुमारास शिक्षण मंत्र्यांना जाग येते आणि विविध शासकीय आदेश, धोरणे व योजना जाहीर होऊ लागतात. त्यातून सरकार आणि/किंवा शिक्षणमंत्री नवीन असेल तर विचारायलाच नको. काय करू आणि काय नको असे त्यांना होऊन जाते. 'ज्याचे हाती शिक्षणाच्या नाड्या तोच देशाचा (व भावी पिढ्यांचा) उद्धारकर्ता' असे वाटत असल्याने आपल्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या पोतडीतून नवनवीन चिजा ते काढू लागतात.

'बंगलो'

'भाषा आणि जीवन' (उन्हाळा २००९)च्या अंकातील' शब्दजिज्ञासा'मधल्या ब्रह्मानंद देशपांडे यांचा 'बंगला' हा लेख वाचला... .... इथे दोन संदर्भग्रंथांची आठवण होते. इंग्रजांच्या काळात बरेच भारतीय शब्द इंग्रजीत वापरले गेले. त्या शब्दांबद्दल माहिती देणारे दोन शब्दकोश म्हणजे जॉर्ज क्लिफर्ड व्हिटवर्थ यांचा 'अँग्लो-इंडियन शब्दकोश' आणि हॉब्सन-जॉब्सन 'अँग्लो-इंडियन शब्दकोश'. या दोन्ही कोशांमध्ये इंग्रजी 'बंगलो' या शब्दाबद्दल खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे.

क्रियापदाचे बदलले स्थान

मराठी आहे एतद्देशीयांची भाषा. तिच्यात होत आहेत काही बदल, विशेष ठळक. काही गोष्टी जाणवतात. काही खुपतात. काही करतात संभ्रमित आणि विचारप्रवण. इंग्रजी भाषेच्या वाक्यरचनेत येते क्रियापद अगोदर. मराठीतही ते येत नाही असे नाही. ते येते, शक्यतो ललित साहित्यात किंवा अपवादात्मक परिस्थितीत. परंतु आता झाली आहे सर्वसाधारण परिस्थितीच अपवादात्मक! दूरदर्शनवर वाढली बातम्यांची चॅनेल्स. २००५ नंतर बनली परिस्थिती जास्त गंभीर. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या कामगारांचा होता त्यात जास्त भरणा. त्यांची बोली गेली लगेच उचलली. हिंदीवर लगेचच पडला त्याचा प्रभाव. मराठी भाषा म्हणून रेटा किंवा रोध शून्य. कारण मराठी माणूस एकतर (परक्यांसाठी) मनमिळाऊ.

Pages