भाषा आणि जीवन

मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ०

सुशान्त शंकर देवळेकर

‘भाषा आणि जीवन’च्या (व० २८, अं० ३) अंकात आलेला ‘संगणकव्यवहाराचे मराठीकरण’ हा लेख ‘उपक्रम’ ह्या संकेतस्थळावर घातला गेला व त्याला प्रतिसाद देताना माझ्या लेखातील काही मुद्दयांबाबत काही उपक्रमींनी मतभेद व्यक्त केले आहेत. त्या संदर्भातील काही मुद्दयांचे स्पष्टीकरण करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना

दिवाकर मोहनी

मराठीची प्रमाणभाषा, बोलण्याची नव्हे तर लिहिण्याची, कशी असावी तर तीमध्ये कोणताही विषय मांडता यावा. शास्त्र किंवा विज्ञान यांची सतत वाढ होत असते म्हणजे त्यांचा परीघ वाढत जातो. त्याचप्रमाणे त्या विषयांची खोलीदेखील वाढत जाते. असे सतत वाढत जाणारे विषय आमच्या भाषेला पेलता यावेत आणि तीमध्ये केलेले लेखन नि:संदिग्ध आणि अल्पाक्षर असावे अशी गरज आहे. अलीकडे लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी होत आहे. सुलभीकरणाची गरज आहे असे मानून मी लेखनाच्या विषयात प्रवेश केला. पण सुलभीकरणाची गरज नाही अशा निष्कर्षाला मी आलो आहे.

खानदेशातील गुर्जर बोली : काही निरीक्षणे

फुला बागुल

महाराष्ट्रातल्या खानदेशात धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत बोलल्या जाणार्‍या विविध बोलींपैकी ‘गुर्जर’ ही एक जातनिदर्शक बोली आहे. गुर्जर ही एक शेती करणारी अत्यंत कष्टकरी, अल्पसंख्य जमात (लोकसंख्या साधारण चाळीस हजार) असून सात्त्विक प्रवृत्तीचीही आहे. कृष्णभक्तीची परंपरा या जातीत असून काही बांधव महानुभाव पंथीय तर काही बांधव स्वाध्याय संप्रदायातील आहेत. रेवा (लेवा) गुजर, दोरे गुजर, डाले गुजर, कडवा गुजर, गरी गुजर, बडगुजर, खापरागुजर या त्यांच्यातील पोटजाती आहेत. पंजाब, राजस्थान, गुजरात येथून गुर्जर अकराव्या शतकात खानदेशात स्थलांतरित झाले. विविध अभ्यासकांनी या संदर्भात पुढील अभिप्राय नोंदविले आहेत.

मराठी कविता : प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे

हेमंत गोविंद जोगळेकर

एका भाषिक प्रदेशातील बोलीभाषा स्थलानुसार बदलत असली तरी लिखित भाषा मात्र बव्हंशी एकच प्रमाणभाषा असते. कवितेची भाषा लिखित गद्य भाषेपेक्षा वेगळी राहिलेली आहे. तिला केवळ सांगायचे नसते. ते सांगणे प्रतीतही करायचे असते. त्यासाठी ती प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे वळत असते. काव्य संस्कृताधिष्ठित असताना केशवसुतांची कविता साध्या मराठीतून आली. त्यासाठी त्यांना त्या काळी शब्ददरिद्रीही म्हणवून घ्यावे लागले. त्यांचा नवा शिपाई

जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या मजला घरच्या दिसताहेत

यमलार्जुन

मा०ना० आचार्य

प्राचीन मराठी काव्यांतील श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन मूळ संस्कृत ग्रंथातील आधारांसह वाचीत असताना 'यमलार्जुन' या शब्दाविषयी आलेला एक मजेदार अनुभव येथे थोडक्यात देत आहे.

संपादकीय: सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषेचा वापर

नीलिमा गुंडी

अलीकडे महाराष्ट्रात तऱ्हेतऱ्‍हेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे पेव फुटले आहे. सन्माननीय अपवाद वगळता या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या भाषेच्या वापराविषयी नाराजी व्यक्त करणे गरजेचे वाटते.

अभिनंदन, भाषावार्ता, आदरांजली

अभिनंदन
या वर्षीचा मराठी ग्रंथासाठी असलेला साहित्य अकादमी पुरस्कार डॉ० अशोक रा० केळकर यांच्या 'रुजुवात' (लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई) या ग्रंथास मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व प्रमाणपत्र असे आहे. पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम फेब्रुवारी २०११ मध्ये होईल. डॉ० केळकरांचे मन:पूर्वक अभिनंदन! [या ग्रंथाचे डॉ० सीताराम रायकर यांनी लिहिलेले परीक्षण 'भाषा आणि जीवन'च्या दिवाळी २००९ (वर्ष २७, अंक ४) या अंकात प्रसिद्ध झाले आहे.]

महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार

पानपूरके

इंग्रजीचे गुलाम!

काही वर्षांपूर्वी सोव्हियट यूनियनचे कॉन्सुलेट जनरल इगोर बोनी नागपूरला आले होते. तेव्हा येथील काही लोकांनी त्यांचे धनवटे रंगमंदिरात भव्य स्वागत केले. त्या सभेचे अध्यक्ष न्या० अभ्यंकर आणि स्वागताध्यक्ष होते कॉ० बर्धन! सत्कारमूर्तींच्या आधी ह्या दोघांची भाषणे इंग्रजीत झाली. पण त्यांचा अनुवाद करण्यात आला नाही.

Pages